Thursday, April 4, 2013

४ एप्रिल २०१३


४ एप्रिल २०१३
आज किती दिवसांनी डायरी सापडली. मागची काही पाने चाळ ली आणि लक्षात आल किती दिवस काय ? महिने झाले लिहून. मी ठरवला होत कि अगदी रोज नाही पण जेव्हा जेव्हा जे काही लक्षणीय घडेल ते या डायरीत लिहायच पण गेल्या काही दिवसात सगळच आयुष्य इतक उलट पालट झाल कि काय लिहाव काय नाही ते कलळच नाही. माझी मुंबई हून पुण्याला बदली काय झाली आणि सगळीच घडी विस्कटली. पण आता मला रतन आणि स्वातीची माझ्या आयुष्यातलं महत्व कळल. इतके दिवस कसे तरी होस्टेल मग PG म्हणून राहिलो तेव्हा घराची आणि स्वातीच्या जेवणाची किंमत कळली. पण अखेर रतन ची परीक्षा संपवून स्वाती काल सार सामान घेऊन काल इथे आली आणि माझ्या जीवात जीव आला. 
आली ती नेमकी सगळी कडे बंद असताना  त्यामुळे भाजीपाल्याची बोंब झाली पण तरी हि तिने बाहेर जेवायला जायचा आग्रह न धरता घरात च पिठलं भात केला . मन भरून पावलं आणि सा मान आवरताना आज डायरी सापडली पान मागच्याच वर्षीची आहेत पण तरीही मी हीच वापरणार आहे. कारण पाने जुनी असली तरी त्यातले माझे अनुभव कायम स्वरूपी चिरतरुण आहेत. 

Wednesday, November 28, 2012

१७ नोवेंबर २०१२

१७ नोवेंबर २०१२
आज शनिवार तसा सुट्टीचा दिवस पण इतर सुट्टीच्या दिवसा सारखा प्रसन्न न जाता जीवाला टोचणी लावूनच गेला. गेले  काही दिवस T V ला  जी बातमी येऊ नये असे वाटत होते ती अखेर आली बाळासाहेब ठाकरेंच अखेरीस निधन झाल. सगळी कडे शोक पसरला त्यातात्ल्या त्यात आम्हा दादरकराना साहेबांचा विशेष जिव्हाळा आणि सहवास ही तेव्हा अजूनच वाईट वाटले.
रतन आणि स्वाती २ दिवस TV  समोर अक्षरश: ठाण मांडून बसले होते. बाळासाहेबांच्या प्रकृती ची चौकशी करण्यासाठी,  कोण कोण सिने कलावंत येत आहेत हे पहायला. या मायलेकांना सिनेमा बाहेर च जग कधी दिसणार आहे कुणास ठावूक ? असो कालाय तस्मै नम: 
पण मला आठवण आली त्या दिवसांची जेंव्हा मला आप्पा दसरा मेळावा किंवा इतर बाळासाहेबांच्या सभांना घेऊन 
जायचे.कधी काळी त्यांच्या भाषणांनी स्फूर्ती घेऊन शिवसेनेत सहभागी होऊन समाजासाठी काही तरी करायचा 
निश्चय मी कधी काळी केला होता. तो निश्चय केवळ निश्चय च राहिला म्हणा. एकदा आप्पांच्या एका मित्राच्या ओळखीने बाळासाहेबांच्या पायां पडण्याच भाग्यही मिळाल होत. या सगळ्या गोष्टी आठवल्या कि अस वाटत  अस  बालपण  अश्या  आठवणी  रतन  ला  कधीच  मिळणार  नाहीत  आणि मिळाल्या तरी त्याला त्याच कितपत गांभीर्य  वाटेल  हा  भाग  वेगळाच  आहे  म्हणा  ही  पिढीचतशी आहे.
पण आज चाळीतही कुणीतरी घरच गेल्या प्रमाणे मरणकळा पसरली होती. दिवाळीचा   सारा  उत्साह  चैतन्य  सार एका क्षणात हरपून गेल.आता उद्या ज्या शिवाजी पार्कात आम्ही खेळलो ,बागडलो,बाळासाहेबांची दसरा 
मेळाव्याची भाषणे पहिली तिथे त्यांना अग्नी देताना पाहण  खरोखरीच असह्या होणारे. पण काळ कुणासाठी कधीच थांबत नाही हे खर....    

Thursday, August 23, 2012

२२ ऑगस्ट २०१२

आज कालची पोर कधी काय करतील याचा नेम नाही. काल रात्री रतन ने शिवाजी पार्क वर सापडलेल कुत्र्याच पिल्लू घरात आणल आणि माझ डोकच उठल. म्हणजे दरवेळेस जेंव्हा तो पार्क मधून येतो तेंव्हा येताना हात पायाला जखमा, मळके कपडे, कुणाच्या तक्रारी घेऊन येतो त्याची आम्हाला आता सवय झाली आहे. पण काल आला तो ते कुत्र्याचे पिल्लूच घेऊन. घरी आलो तेंव्हा रतन आणि  सगळी चाळीची पोरे कुत्र्याला घेऊन वरांड्यात खेळवत बसली होती. मला वाटल दुसर्याच कुणाच असेल पण रात्री घरीच घेऊन आला. मग त्याला आमच्या बरोबरीने जेऊ घातलं, झोपायला अंथरूण घातलं. काय काय उच्छाद चालू होते रात्रभर. मी ओरडलो देखील परंतु चीरांजीवांनी मातोश्रींची परवानगी घेतल्यामुळे आमचे काय चालणार.
सकाळी उठल्याप्सून त्याच्याच मागे होता. स्वतःची शाळेची तयारी सोडून त्याच्याच मागे होता. स्वतः बरोबर त्याला पण आंघोळ घातली पठ्ठ्याने. पिल्लू क्या क्या करून ओरडत होत पण हा काही थांबला नाही. माझ तर डोकच उठल. कसाबसा ऑफीसला पोचलो. माझा वैतागलेला चेहरा पाहून सावंत ने विचारले काय झाले मी मग सगळी हकीकत सांगितली. म्हणल  आता या कटकटी पासून सुटका कशी होईल ते तूच सांग. मला म्हणला, "आज रतन शाळेतून यायच्या आत घरी जा कुत्र्याला पिशवीत घाल आणि दादर स्टेशन च्या पलीकडे सोडून ये म्हणजे झाल रतन ला सांग कुत्र बाहेर खेळता खेळता निघून गेल." मला हा उपाय अतिशय आवडला. नवीन उत्साहाने कामाला लागलो. आणि कामाच्या नादात लवकर निघायचं विसरूनच गेल. जस  लक्षात  आल  तसा  पटकन  निघालो  कधी नव्हे ते स्टेशन पर्यंत रिक्षा केली.
घरी जाऊन पाहतो तर काय चाळीच्या जिन्यातच रतन शाळेतल्या मित्रां सोबत बसला होता. अवती  भवती   सारी  शाळेची पोर आणि मध्ये कुत्र्याचे पिल्लू. रतन त्यांना सांगत होता ,"तुम्ही कायम मला चिडवायचा ना कि तुला कुणी बहिण, भाऊ नाही, आपला भाऊ किंवा बहिण च आपला best  friend  असतो आज पासून  मला पण लहान भाऊ आहे हाच माझा भाऊ मी याच नाव पण ठेवलय "मन्या" आता आम्ही रोज खूप खेळणार, मस्ती करणार "
त्याचे ते बोलण  ऐकल आणि माझा सारा विरोधच मावळला. खरच जर आर्थिक सुबत्ता असती तर रतन ला एक भाऊ किंवा बहिण नक्की देऊ शकलो असतो. पण पोराने हा प्रश्न किती सहज आणि चुटकी सरशी मिटवला. अचानक पिल्लू गोंडस वाटू लागल. म्हणल जाऊ दे पाळूदे पोराला पिल्लू .एक पोर जन्माला घालून मोठ करण्याच्या खर्चापेक्षा हा खर्च कित्येक पटीने कमी आहे. विचार पक्का केला आणि पोरांची गर्दी बाजूला करत घरी आलो.
सौभाग्यावातीना म्हणल आज काहीतरी गोड धोड करा आज आपल कुटुंब चौकोनी झालय.

Thursday, August 9, 2012

८ ऑगस्ट २०१२

८ ऑगस्ट २०१२
आज ऑफिस मधून घरी आलो तोच चाळीतल वातावरण बदलेल होत. सर्व  २-३ , २-३जणांचा घोळका करून काहीतरी कुजबुजत उभ होत. घरी  गेलो  तर  स्वातीचा चेहरा  हि  काहीसा  tension  मध्ये  दिसला  मी  व्विचाराल  काय  झाल  तसा  तिने  सारा  प्रसंग  सांगितला  आणि  हादरून  च  गेलो.  चाळीतल्या सावंत वाहिनी म्हणजे स्वातीची कंठश्च मैत्रीण नंदा चा मोठा मुलगा समीर सकाळ पासून घरातून गायब होता. नुकताच बारावीची परीक्षा दिलेला समीर आमच्या सगळ्यांचाच लाडका होता. अगदी अतिहुशार नाही की अगदी ढ म्हणण्यासारखा हि नाही  बारावीला  1st class ने पास झालेला.  सकाळी म्हणे  त्याने engineering दिलेल्या CET  च्या  result च्या basis वर कोणते कॉलेज allot   झाले  आहे  हे  जो बघायला गेला तो आलाच नाही. दुपार पासून नंदा वाहिनी  शोधाशोध  करत  फिरत  होत्या  बिना  नवर्याची  बी एकटी  कुठे  कुठे  पुरणार.  तरी चाळीतली इतर पोर आणि बाकीची माणसे मदतीला लागली. मित्र, नातेवाईक, कॉलेज सगळे शोधून झाले पण पठ्ठ्याचा काही पत्ताच नाही.  शेवटी  पोलिसात  तक्रार  नोंदवून  सगळी चाळीत परतली. ऐकून मला सुन्नच व्हायला झाल. स्वाती नंदाला आणि इतर नातेवाईकांना जेवणाच देऊन आली. एरवी  गाजब्जाणारी  आमची चाळ अगदी  चिडीचुप्प होती.
साधारण  अकरा  च्या सुमारास गलका ऐकू आला म्हणून मी आणि स्वाती बाहेर जाऊन पाहू लागलो. एका पारशी दाम्पत्या सोबत जखमी समीर चाळीत दाखल झाला होता सर्वांनी त्याच्या भोवती एकच गराडा घातला. डोक्याला हाताला,पायाला अनेक जखमा झाल्या होता एक पाय ही fracture  झाला होता. नंदा वाहिनिना तर काय कराव काय नाही सुचत च नव्हत.
सकाळी  result पाहायला बाहेर पडलेल्या समीर ने जेंव्हा पहिले कि त्याच्या score ला त्याला कुठलेही कॉलेज allot ch झाले नाहीये आणि आता जर admission घ्यायची असेल तर त्याच्या विधवा आईला लाख्खो रुपयांचे donation द्यावे लागणार आहे जे शक्य नाही. आणि ते जर शक्य नाही तर त्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही या विचारात रस्ता ओलांडत असताना एका पारशी जोडप्याच्या गाडी खाली आला. ते पारशी जोडप अतिशय चांगल त्यांनी त्याला दवाखान्यात नेला आणि शुद्धीत आल्यावर त्याला घरी आणून सोडले. समीर ची ती अवस्था आणि नंदा वहिनींचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. ज्याला जेवढे शक्य झाले त्या परीने प्रत्येकाने नंदा वाहिनीना समजावले आणि घरी गेले. मी आणि स्वाती ही घरी आलो.
हातात शाळेचे पुस्तक घेऊन रतन ला झोप शांत झोप लागली होती. या गळचेपी करणाऱ्या स्पर्धेच्या जगाशी अजून बिचार्याचा काहीच संबंध आला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहून मनापासून tension आल आपल पोरग या स्पर्धेत कसा टिकेल? स्पर्धेत तो कुठ मागे तर नाही पडणार ना ?या आणि अनेक प्रश्नांनी डोक भांडवून गेल. बघू आता येणारा काळच याची उत्तरे देईल आता तरी त्याच्या चेहरया वरचे हसरे निरागस भाव डोळ्यात साठवून घेतो कुणास ठावूक नंतर मिळतील की नाही कालाय तस्मै नमः

Tuesday, April 24, 2012

२३ एप्रिल २०१२

२३ एप्रिल २०१२
आज बर्याच दिवसांनी डायरी लिहायला वेळ मिळाला. काल एकदाचे ऑडीट संपले अन आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दर साला बाद प्रमाणे सगळे ऑडीट Final मी केले aani सही साठी साहेबाकडे गेले. ऑडीट करायला आलेल्या नवीन CA ला तो मोठा धक्का होता मला म्हणाला" मुझे तो लगा था आप ही Sign करोगे" तेंव्हा त्याला मी CA नाही केवळ CA Inter पास आहे हे सांगताना खूप त्रास झाला. तो बिचारा गोंधळून निघून गेला पण माझी जुनी जखम पुन्हा ओलावली.
आज दिवस भर आप्पांची खूप आठवण आली. आप्पा जर अचानक गेले नसते तर मला माझे CA  चे शिक्षण अर्ध्यावर सोडून नोकरी धरावी लागली नसती. आप्पांना मला CA होऊन ऑडीटर झालेलं पहायचं होत. पण त्यांची तेवढी अखेरची इच्छा देखील मी पूर्ण करू शकलो नाही. खर तर मनीषा च्या लग्नानंतर मला CA पूर्ण करता आल असत पण तेंव्हा आई गेली अन आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो. मग एका मागून एक वाढलेले व्याप त्याच्यासाठी आर्थिक तरतूद करता करता माझ CA करायचं स्वप्न राहून च गेल.
पण आज वाटत या सगळ्या समजुती आहेत मी माझ्या मनाला घातलेल्या. खर म्हणजे माझी जिद्द आणि चिकाटीच कमी पडली. आप्पांचा मृत्यू ही सबब न होता ती माझी प्रेरणा व्हायला हवी होती. पण अखेर ती झाली नाही  आणि आज कितीही मनात आणल तरी रतन च्या मांडीला मांडी लावून मी  अभ्यासाला बसू शकेन असे खरच वाटत नाही. 
CA च काय पण अशा अनेक गोष्टी जिथे मी जरा तग धरला असता तर काश आज जिंदगी का रुख कुछ और होता. असो पण आत्ता देखील जे काही चालू  आहे तेही काही वाईट नाही. अनेकांच्या लेखी तेही सुख नाही. तेंव्हा जे काही चालू आहे ते उत्तम च चालू आहे हेच खर. कारण ह्या आयुष्याच चांगल वाईट  घडवण हे तुमच्याच हाती असत. जे काही घडल अथवा नाही घडल हे सर्वस्वी तुमच्या निर्णयांच फलित आहे आणि त्याचा आदर राखण ही फक्त तुमची आणि तुमची च जवाबदारी आहे.
पण ज्या तडजोडी मला कराव्या लागल्या त्या मी रतन ला नाही करून देणार त्याला हव ते त्याला करून देणार अगदी पोरग अभिनयात जाणार म्हणल तरी काळजावर दगड ठेवून त्याला पूर्ण पाठींबा देणार कारण तेच तर आई वडिलांचं कर्तव्य असत. बाकी CA होण आमच्या खानदानात च लिहिलेलं दिसत नाहीये. मला इच्छा होती तर परिस्थिती अनुकूल नव्हती तर आमच्या चिरंजीवाना परिस्थिती अनुकूल असून दूर दूर वर इच्छा च नाही.

कालाय तस्मै नम: !!!!!

Wednesday, March 21, 2012

२२ मार्च २०१२

आज सकाळी मस्त पैकी पेपर उघडला आणि उडालोच सगळा पेपर गुढीपाडव्या निमित्त च्या ऑफर्स नी भरला होता. डोक्यात लख्ख उजेड पडला स्वाती ला मागच्या महिन्यात गुढीपाडव्याला नवीन Food  Processor  घेऊन देईन असे कबूल केले होते आणि ते मी पूर्णतः विसरून गेलो होतो. मी मनात म्हणल "बोरकर आता तुमची खैर नाही. एक तर तुम्ही साफ विसरलात त्यात पैशांची ही काही सोय केली नाहीये जेणे करून उद्या तरी जाऊन Food  Processor   घेता येईल. उद्याचा पाडवा काही धड होत नाही आता" पेपर तसाच ऑफिस च्या पिशवीत टाकला जेणेकरून स्वाती ची त्यावर नजर नको पडायला. पटकन आवरले आणि स्वाती ला कमीतकमी तोंड दाखवत घरातून बाहेर पडलो.ऑफिस ला पोचलो खरा पण डोक्यात Food  Processor   चे च विचार घुमत होते. एवढी महत्वाची गोष्ट कशी विसरलो आपण याचा माझा मलाच खूप राग आला. तसं बघायला गेल तर तिची मागणी अवाजवी नव्हती बिचारी लग्न झाल्यापासून  तिच्या  मामाने  लग्नात  दिलेला  च  साधा  mixer वापरत होती. मागच्या महिन्यात त्या बिचाऱ्याने मान टाकली ती ही अशी कि जी दुरुस्त न होण्या सारखी होती. त्यात च  शेजारच्या  करंदीकर  वहिनींनी  स्वातीच्या  डोक्यात  भुंगा  सोडलं  की  आता  साधे  mixer   वगैरे घेत बसू नकोस  All  In One  Food  Processor  च घे. त्यांनी फुकट चा सल्ला दिला पण झाल आता माझ्या खिशाला बसणार होती. मी ही अगदी छातीठोक पणे सांगितले या महिन्यात नको गुढीपाडव्या च्या चांगल्या मुहूर्तावर घेऊ. मुहूर्त वगैरे काही नाही मला पैशांची जोडणी करायला वेळ पाहिजे होता एवढच. आता ऑफिस मधून advance  घ्यायचा तर त्याला ही २ दिवस लागणार होते आणि बाकी च्या कोणाकडे ही मागायची सोय नवती कारण सगळ्यांचेच काही ना काही खरेदी चे plans होते. मोठ्ठ्या निर्धाराने मनाची तयारी केली आणि शिव्या खायच्या दृष्टीने च घरी गेलो मुद्दाम जरा उशिराच गेलो.
गेलो तर रतन एकटाच बाहेर TV बघत बसला होता.विचारल आई कुठाय तर म्हणला बाहेर गेलीये मी सुटकेचा निश्वास सोडला पटकन जेऊन स्वाती यायच्या आत झोपून टाकव म्हणून पटकन स्वयपाक घरात गेलो तर ओट्यावर मोठ्ठे पांढरे box होते. काय आहे म्हणून उघडून पहिले तर आत नवा कोरा Food  Processor  होता. मला क्षणभर वाटले की मी स्वप्नात आहे. म्हणून मी मागे फिरलो तर स्वाती आणि रतन माझी मजा बघत स्वयपाक घराच्या दारात हसत उभे होते. मला अगदी च खजील झाल्या सारखे झाले. रतन म्हणला," बाबा तुम्ही सकळी पळालात पण आई नी आणि मी जाऊन आणला नवीन Food  Processor  आता आई रोज मला यावर नवीन नवीन गोष्टी करून देणार आहे." असे म्हणून तो बाहेर खेळायला गेला. मी नजरेने च विचारल याचे पैसे कुठून आणलेस ? त्यावर बाईसाहेब म्हणल्या " बोरकर तुम्ही विसरलात पण मी नाही. मला  कालच  भिशी  लागली.  त्याच  पैशांनी हा Food  Processor  घेतला. खर तर सकळी च सांगणार होते पण तुम्ही मला मस्त पैकी शेंडी लावून ऑफिस ला पसार झालात. म्हणून मी पण म्हणल तुम्हाला ही जरा  आश्चर्याचा  धक्का  द्यावा  म्हणून तुम्ही यायच्या वेळेला शेजारी जाऊन बसले. कस आहे तुम्ही  जेवढी  दुष्ट,  कुचकी,  तापट  आणि अडाणी समाजता मला तेवढी मी नाहीये. तुमच्या अडचणी कळतात मला." हे म्हणजे अगदी पहिल्या बॉल वर दांडक उडवल्या सारखी माझी अवस्था झाली. आता काय आणि कस बोलू मला सुचत च नव्हत. ते काम ही तिनेच सोप्प केल मला म्हणली. " अस समजू नका बर का की तुमचा खर्च वाचला. दर महिना ५०० रुपये हिशोबाने व्याजा सकट वसूल करणार आहे मी याचे पैसे. आणि हो अस समजू नका तुमच्या जीभे चे चोचले पुरवण्या साठी हा Food  Processor  घेतलाय हा मी माझ्या रतन च्या फर्माइशी पूर्ण करण्या साठी घेतलाय. उद्या पूजा करून यावर च सगळा स्वयपाक करणार आहे."  
मी हसून तिला संमती दिली आणि ती मला Food  Processor  ची features  दाखवू लागली.
स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंत काळाची माता असते हेच खर.....

Tuesday, March 6, 2012

२९ फेब्रुवारी २०१२

आजचा दिवस काहीसा नकारात्मक भावनेने च सुरु केला कारण एक तर आज २९ फेब्रुवारी म्हणजे बाकी च्या फेब्रुवारी महिन्यात पगार लवकर मिळायचा जो आनंद होत असतो त्या च्या मधला मोठ्ठा अडसर आणि दूसर म्हणजे आज आम्हाला हीच्या आत्या कडे डोंबिवली ला जेवायला बोलावले होते. एक तर ही च्या आत्याना  ऐकू कमी येत आणि मी गेलो कि त्यांना गप्पा मारायचा एकदम चेव येतो आणि ओरडून बोलून बोलून माझा घसा मात्र कामातून जातो.
तेंव्हा आज ऑफिस मधून हाफ डे राजा टाकून घरी आलो. पाच ला रतन शाळेतून आल्या बरोबर लगेच निघालो. लवकर निघालो त्यामुळे ट्रेन ला ही जास्त गर्दी मिळाली नाही.मी रतन आणि स्वाती बसलो होतो. तोच तिथे रतन च्या च वयाचा एक मुलगा हातात काही बाराखडी, गोष्टींची आणि चित्रे रंगवण्याची पुस्तके विकायला आला. आम्ही तिघे बसलेलो बघून आमच्या सीट पाशी आला. मला म्हणाला, "साहेब देऊ का A B C D ? , गोष्टी इसापनीती...?" रतन ने स्वाती कडे आशाळभूत पणे पहिले तोच स्वाती ने त्याला डोळ्यानीच जे काय सांगायचं ते सांगितले. रतन चिडून खिडकी बाहेर पाहू लागला. तो मुलगा काही च न झाल्या प्रमाणे पुढे निघून गेला. माझी नजर मात्र त्याच्यावर च खिळून राहिली. तो प्रत्येका पाशी जाऊन विचारत होता. तो सगळा डबा पालथा घालून पुन्हा आमच्या इथून जाऊ लागला. मी त्याला थांबवलं आणि विचारलं "काय रे एवढी A B C D ,गोष्टींची पुस्तके विकतो आहेस पण स्वतः शाळेत जातोस का? त्या वर तो म्हणाला " ओ साहेब घ्यायचं असेल तर घ्याना उगाच वेळ का घालवताय" असे म्हणून तो गेला. पण मला अजिबात त्याचा राग आला नाही. कारण ज्या हिम्मतीने तो न थकता कोणत्याही नकाराची परवा न करता तेवढ्याच कष्टाने पुढचा प्रयत्न करत होता. त्याच्यातली ती जिद्द, ती नकार सहन करायची शक्ती आमच्या रतन ला किमान १०% तरी मिळावी असे क्षणभर वाटून गेले.
आत्यांकडे गेलो तिथे त्यांचा US return मुलगा,त्याची बायको आणि त्यांची ५ वर्षांची मुलगी होती. सुट्टीसाठी इकडे आले होते म्हणून आत्यांनी आम्हाला जेवायला बोलावले होते.त्यांची ती मुलगी कुठलेसे अमेरिकन चोकलेट  चघळत बसली होती. काही वेळाने ते संपले तसे तिनी भोकाड पसरले तिला तसेच चोकलेट पुन्हा हवे होते. दुर्भाग्य म्हणजे नेमके ते चोकलेट संपले होते. पोरीचे रडणे काही थांबेना आणि सगळ घर दार तिच्या मागे समजूत घालत फिरत होते. शेवटी महाप्रयत्ना नंतर ती शांत झाली आणि आम्ही जेवायला बसलो.एरवी आत्यांशी बोलून घसा दुखतो आज या पोरीने कानाचे पार बारा वाजवले.
घरी येताना ट्रेन मध्ये बसताच तो पुस्तक विकणारा मुलगा आठवला. आज एका चोकलेट च्या हटटा पायी समजूत घालणारे आम्ही सगळे तिकडे या मुलाच्या मुलभूत गरजा बघणारे ही कुणी नाही. काय तफावत आहे नाही आपल्या देशात. आपण खूपच सामान्य असल्याची टोचणी मनाला लागली स्टेशन मधून बाहेर पडलो तोच बाहेर एका नुकत्याच विजयी झालेल्या आमदाराचा विजयी मुद्रेतील मोठठां flex लावला होता. त्याच्या खाली येणाऱ्या पाच वर्षातील विकास कामांची यादी त्याने दिली होती. मनात विचार आला आपण सामान्य आहोत पण ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्या तरी विकास आराखड्यात कुठे या मुलांचा विकास लिहिला आहे.
शेवटी विचार करायचा नाही म्हणल तरी डोक ऐकत नाही त्याच काय ?  जाऊदे ज्याच त्याच नशीब एवढाच आपण म्हणून शकतो.
भगवंता श्रीमंत नाही पण चांगल्या खात्या पित्या घरात जन्माला घातलेस याचे आभार रे बाबा.....