Wednesday, November 28, 2012

१७ नोवेंबर २०१२

१७ नोवेंबर २०१२
आज शनिवार तसा सुट्टीचा दिवस पण इतर सुट्टीच्या दिवसा सारखा प्रसन्न न जाता जीवाला टोचणी लावूनच गेला. गेले  काही दिवस T V ला  जी बातमी येऊ नये असे वाटत होते ती अखेर आली बाळासाहेब ठाकरेंच अखेरीस निधन झाल. सगळी कडे शोक पसरला त्यातात्ल्या त्यात आम्हा दादरकराना साहेबांचा विशेष जिव्हाळा आणि सहवास ही तेव्हा अजूनच वाईट वाटले.
रतन आणि स्वाती २ दिवस TV  समोर अक्षरश: ठाण मांडून बसले होते. बाळासाहेबांच्या प्रकृती ची चौकशी करण्यासाठी,  कोण कोण सिने कलावंत येत आहेत हे पहायला. या मायलेकांना सिनेमा बाहेर च जग कधी दिसणार आहे कुणास ठावूक ? असो कालाय तस्मै नम: 
पण मला आठवण आली त्या दिवसांची जेंव्हा मला आप्पा दसरा मेळावा किंवा इतर बाळासाहेबांच्या सभांना घेऊन 
जायचे.कधी काळी त्यांच्या भाषणांनी स्फूर्ती घेऊन शिवसेनेत सहभागी होऊन समाजासाठी काही तरी करायचा 
निश्चय मी कधी काळी केला होता. तो निश्चय केवळ निश्चय च राहिला म्हणा. एकदा आप्पांच्या एका मित्राच्या ओळखीने बाळासाहेबांच्या पायां पडण्याच भाग्यही मिळाल होत. या सगळ्या गोष्टी आठवल्या कि अस वाटत  अस  बालपण  अश्या  आठवणी  रतन  ला  कधीच  मिळणार  नाहीत  आणि मिळाल्या तरी त्याला त्याच कितपत गांभीर्य  वाटेल  हा  भाग  वेगळाच  आहे  म्हणा  ही  पिढीचतशी आहे.
पण आज चाळीतही कुणीतरी घरच गेल्या प्रमाणे मरणकळा पसरली होती. दिवाळीचा   सारा  उत्साह  चैतन्य  सार एका क्षणात हरपून गेल.आता उद्या ज्या शिवाजी पार्कात आम्ही खेळलो ,बागडलो,बाळासाहेबांची दसरा 
मेळाव्याची भाषणे पहिली तिथे त्यांना अग्नी देताना पाहण  खरोखरीच असह्या होणारे. पण काळ कुणासाठी कधीच थांबत नाही हे खर....