Thursday, August 23, 2012

२२ ऑगस्ट २०१२

आज कालची पोर कधी काय करतील याचा नेम नाही. काल रात्री रतन ने शिवाजी पार्क वर सापडलेल कुत्र्याच पिल्लू घरात आणल आणि माझ डोकच उठल. म्हणजे दरवेळेस जेंव्हा तो पार्क मधून येतो तेंव्हा येताना हात पायाला जखमा, मळके कपडे, कुणाच्या तक्रारी घेऊन येतो त्याची आम्हाला आता सवय झाली आहे. पण काल आला तो ते कुत्र्याचे पिल्लूच घेऊन. घरी आलो तेंव्हा रतन आणि  सगळी चाळीची पोरे कुत्र्याला घेऊन वरांड्यात खेळवत बसली होती. मला वाटल दुसर्याच कुणाच असेल पण रात्री घरीच घेऊन आला. मग त्याला आमच्या बरोबरीने जेऊ घातलं, झोपायला अंथरूण घातलं. काय काय उच्छाद चालू होते रात्रभर. मी ओरडलो देखील परंतु चीरांजीवांनी मातोश्रींची परवानगी घेतल्यामुळे आमचे काय चालणार.
सकाळी उठल्याप्सून त्याच्याच मागे होता. स्वतःची शाळेची तयारी सोडून त्याच्याच मागे होता. स्वतः बरोबर त्याला पण आंघोळ घातली पठ्ठ्याने. पिल्लू क्या क्या करून ओरडत होत पण हा काही थांबला नाही. माझ तर डोकच उठल. कसाबसा ऑफीसला पोचलो. माझा वैतागलेला चेहरा पाहून सावंत ने विचारले काय झाले मी मग सगळी हकीकत सांगितली. म्हणल  आता या कटकटी पासून सुटका कशी होईल ते तूच सांग. मला म्हणला, "आज रतन शाळेतून यायच्या आत घरी जा कुत्र्याला पिशवीत घाल आणि दादर स्टेशन च्या पलीकडे सोडून ये म्हणजे झाल रतन ला सांग कुत्र बाहेर खेळता खेळता निघून गेल." मला हा उपाय अतिशय आवडला. नवीन उत्साहाने कामाला लागलो. आणि कामाच्या नादात लवकर निघायचं विसरूनच गेल. जस  लक्षात  आल  तसा  पटकन  निघालो  कधी नव्हे ते स्टेशन पर्यंत रिक्षा केली.
घरी जाऊन पाहतो तर काय चाळीच्या जिन्यातच रतन शाळेतल्या मित्रां सोबत बसला होता. अवती  भवती   सारी  शाळेची पोर आणि मध्ये कुत्र्याचे पिल्लू. रतन त्यांना सांगत होता ,"तुम्ही कायम मला चिडवायचा ना कि तुला कुणी बहिण, भाऊ नाही, आपला भाऊ किंवा बहिण च आपला best  friend  असतो आज पासून  मला पण लहान भाऊ आहे हाच माझा भाऊ मी याच नाव पण ठेवलय "मन्या" आता आम्ही रोज खूप खेळणार, मस्ती करणार "
त्याचे ते बोलण  ऐकल आणि माझा सारा विरोधच मावळला. खरच जर आर्थिक सुबत्ता असती तर रतन ला एक भाऊ किंवा बहिण नक्की देऊ शकलो असतो. पण पोराने हा प्रश्न किती सहज आणि चुटकी सरशी मिटवला. अचानक पिल्लू गोंडस वाटू लागल. म्हणल जाऊ दे पाळूदे पोराला पिल्लू .एक पोर जन्माला घालून मोठ करण्याच्या खर्चापेक्षा हा खर्च कित्येक पटीने कमी आहे. विचार पक्का केला आणि पोरांची गर्दी बाजूला करत घरी आलो.
सौभाग्यावातीना म्हणल आज काहीतरी गोड धोड करा आज आपल कुटुंब चौकोनी झालय.

Thursday, August 9, 2012

८ ऑगस्ट २०१२

८ ऑगस्ट २०१२
आज ऑफिस मधून घरी आलो तोच चाळीतल वातावरण बदलेल होत. सर्व  २-३ , २-३जणांचा घोळका करून काहीतरी कुजबुजत उभ होत. घरी  गेलो  तर  स्वातीचा चेहरा  हि  काहीसा  tension  मध्ये  दिसला  मी  व्विचाराल  काय  झाल  तसा  तिने  सारा  प्रसंग  सांगितला  आणि  हादरून  च  गेलो.  चाळीतल्या सावंत वाहिनी म्हणजे स्वातीची कंठश्च मैत्रीण नंदा चा मोठा मुलगा समीर सकाळ पासून घरातून गायब होता. नुकताच बारावीची परीक्षा दिलेला समीर आमच्या सगळ्यांचाच लाडका होता. अगदी अतिहुशार नाही की अगदी ढ म्हणण्यासारखा हि नाही  बारावीला  1st class ने पास झालेला.  सकाळी म्हणे  त्याने engineering दिलेल्या CET  च्या  result च्या basis वर कोणते कॉलेज allot   झाले  आहे  हे  जो बघायला गेला तो आलाच नाही. दुपार पासून नंदा वाहिनी  शोधाशोध  करत  फिरत  होत्या  बिना  नवर्याची  बी एकटी  कुठे  कुठे  पुरणार.  तरी चाळीतली इतर पोर आणि बाकीची माणसे मदतीला लागली. मित्र, नातेवाईक, कॉलेज सगळे शोधून झाले पण पठ्ठ्याचा काही पत्ताच नाही.  शेवटी  पोलिसात  तक्रार  नोंदवून  सगळी चाळीत परतली. ऐकून मला सुन्नच व्हायला झाल. स्वाती नंदाला आणि इतर नातेवाईकांना जेवणाच देऊन आली. एरवी  गाजब्जाणारी  आमची चाळ अगदी  चिडीचुप्प होती.
साधारण  अकरा  च्या सुमारास गलका ऐकू आला म्हणून मी आणि स्वाती बाहेर जाऊन पाहू लागलो. एका पारशी दाम्पत्या सोबत जखमी समीर चाळीत दाखल झाला होता सर्वांनी त्याच्या भोवती एकच गराडा घातला. डोक्याला हाताला,पायाला अनेक जखमा झाल्या होता एक पाय ही fracture  झाला होता. नंदा वाहिनिना तर काय कराव काय नाही सुचत च नव्हत.
सकाळी  result पाहायला बाहेर पडलेल्या समीर ने जेंव्हा पहिले कि त्याच्या score ला त्याला कुठलेही कॉलेज allot ch झाले नाहीये आणि आता जर admission घ्यायची असेल तर त्याच्या विधवा आईला लाख्खो रुपयांचे donation द्यावे लागणार आहे जे शक्य नाही. आणि ते जर शक्य नाही तर त्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही या विचारात रस्ता ओलांडत असताना एका पारशी जोडप्याच्या गाडी खाली आला. ते पारशी जोडप अतिशय चांगल त्यांनी त्याला दवाखान्यात नेला आणि शुद्धीत आल्यावर त्याला घरी आणून सोडले. समीर ची ती अवस्था आणि नंदा वहिनींचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. ज्याला जेवढे शक्य झाले त्या परीने प्रत्येकाने नंदा वाहिनीना समजावले आणि घरी गेले. मी आणि स्वाती ही घरी आलो.
हातात शाळेचे पुस्तक घेऊन रतन ला झोप शांत झोप लागली होती. या गळचेपी करणाऱ्या स्पर्धेच्या जगाशी अजून बिचार्याचा काहीच संबंध आला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहून मनापासून tension आल आपल पोरग या स्पर्धेत कसा टिकेल? स्पर्धेत तो कुठ मागे तर नाही पडणार ना ?या आणि अनेक प्रश्नांनी डोक भांडवून गेल. बघू आता येणारा काळच याची उत्तरे देईल आता तरी त्याच्या चेहरया वरचे हसरे निरागस भाव डोळ्यात साठवून घेतो कुणास ठावूक नंतर मिळतील की नाही कालाय तस्मै नमः