Thursday, August 9, 2012

८ ऑगस्ट २०१२

८ ऑगस्ट २०१२
आज ऑफिस मधून घरी आलो तोच चाळीतल वातावरण बदलेल होत. सर्व  २-३ , २-३जणांचा घोळका करून काहीतरी कुजबुजत उभ होत. घरी  गेलो  तर  स्वातीचा चेहरा  हि  काहीसा  tension  मध्ये  दिसला  मी  व्विचाराल  काय  झाल  तसा  तिने  सारा  प्रसंग  सांगितला  आणि  हादरून  च  गेलो.  चाळीतल्या सावंत वाहिनी म्हणजे स्वातीची कंठश्च मैत्रीण नंदा चा मोठा मुलगा समीर सकाळ पासून घरातून गायब होता. नुकताच बारावीची परीक्षा दिलेला समीर आमच्या सगळ्यांचाच लाडका होता. अगदी अतिहुशार नाही की अगदी ढ म्हणण्यासारखा हि नाही  बारावीला  1st class ने पास झालेला.  सकाळी म्हणे  त्याने engineering दिलेल्या CET  च्या  result च्या basis वर कोणते कॉलेज allot   झाले  आहे  हे  जो बघायला गेला तो आलाच नाही. दुपार पासून नंदा वाहिनी  शोधाशोध  करत  फिरत  होत्या  बिना  नवर्याची  बी एकटी  कुठे  कुठे  पुरणार.  तरी चाळीतली इतर पोर आणि बाकीची माणसे मदतीला लागली. मित्र, नातेवाईक, कॉलेज सगळे शोधून झाले पण पठ्ठ्याचा काही पत्ताच नाही.  शेवटी  पोलिसात  तक्रार  नोंदवून  सगळी चाळीत परतली. ऐकून मला सुन्नच व्हायला झाल. स्वाती नंदाला आणि इतर नातेवाईकांना जेवणाच देऊन आली. एरवी  गाजब्जाणारी  आमची चाळ अगदी  चिडीचुप्प होती.
साधारण  अकरा  च्या सुमारास गलका ऐकू आला म्हणून मी आणि स्वाती बाहेर जाऊन पाहू लागलो. एका पारशी दाम्पत्या सोबत जखमी समीर चाळीत दाखल झाला होता सर्वांनी त्याच्या भोवती एकच गराडा घातला. डोक्याला हाताला,पायाला अनेक जखमा झाल्या होता एक पाय ही fracture  झाला होता. नंदा वाहिनिना तर काय कराव काय नाही सुचत च नव्हत.
सकाळी  result पाहायला बाहेर पडलेल्या समीर ने जेंव्हा पहिले कि त्याच्या score ला त्याला कुठलेही कॉलेज allot ch झाले नाहीये आणि आता जर admission घ्यायची असेल तर त्याच्या विधवा आईला लाख्खो रुपयांचे donation द्यावे लागणार आहे जे शक्य नाही. आणि ते जर शक्य नाही तर त्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही या विचारात रस्ता ओलांडत असताना एका पारशी जोडप्याच्या गाडी खाली आला. ते पारशी जोडप अतिशय चांगल त्यांनी त्याला दवाखान्यात नेला आणि शुद्धीत आल्यावर त्याला घरी आणून सोडले. समीर ची ती अवस्था आणि नंदा वहिनींचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. ज्याला जेवढे शक्य झाले त्या परीने प्रत्येकाने नंदा वाहिनीना समजावले आणि घरी गेले. मी आणि स्वाती ही घरी आलो.
हातात शाळेचे पुस्तक घेऊन रतन ला झोप शांत झोप लागली होती. या गळचेपी करणाऱ्या स्पर्धेच्या जगाशी अजून बिचार्याचा काहीच संबंध आला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहून मनापासून tension आल आपल पोरग या स्पर्धेत कसा टिकेल? स्पर्धेत तो कुठ मागे तर नाही पडणार ना ?या आणि अनेक प्रश्नांनी डोक भांडवून गेल. बघू आता येणारा काळच याची उत्तरे देईल आता तरी त्याच्या चेहरया वरचे हसरे निरागस भाव डोळ्यात साठवून घेतो कुणास ठावूक नंतर मिळतील की नाही कालाय तस्मै नमः

No comments:

Post a Comment