Tuesday, April 24, 2012

२३ एप्रिल २०१२

२३ एप्रिल २०१२
आज बर्याच दिवसांनी डायरी लिहायला वेळ मिळाला. काल एकदाचे ऑडीट संपले अन आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दर साला बाद प्रमाणे सगळे ऑडीट Final मी केले aani सही साठी साहेबाकडे गेले. ऑडीट करायला आलेल्या नवीन CA ला तो मोठा धक्का होता मला म्हणाला" मुझे तो लगा था आप ही Sign करोगे" तेंव्हा त्याला मी CA नाही केवळ CA Inter पास आहे हे सांगताना खूप त्रास झाला. तो बिचारा गोंधळून निघून गेला पण माझी जुनी जखम पुन्हा ओलावली.
आज दिवस भर आप्पांची खूप आठवण आली. आप्पा जर अचानक गेले नसते तर मला माझे CA  चे शिक्षण अर्ध्यावर सोडून नोकरी धरावी लागली नसती. आप्पांना मला CA होऊन ऑडीटर झालेलं पहायचं होत. पण त्यांची तेवढी अखेरची इच्छा देखील मी पूर्ण करू शकलो नाही. खर तर मनीषा च्या लग्नानंतर मला CA पूर्ण करता आल असत पण तेंव्हा आई गेली अन आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो. मग एका मागून एक वाढलेले व्याप त्याच्यासाठी आर्थिक तरतूद करता करता माझ CA करायचं स्वप्न राहून च गेल.
पण आज वाटत या सगळ्या समजुती आहेत मी माझ्या मनाला घातलेल्या. खर म्हणजे माझी जिद्द आणि चिकाटीच कमी पडली. आप्पांचा मृत्यू ही सबब न होता ती माझी प्रेरणा व्हायला हवी होती. पण अखेर ती झाली नाही  आणि आज कितीही मनात आणल तरी रतन च्या मांडीला मांडी लावून मी  अभ्यासाला बसू शकेन असे खरच वाटत नाही. 
CA च काय पण अशा अनेक गोष्टी जिथे मी जरा तग धरला असता तर काश आज जिंदगी का रुख कुछ और होता. असो पण आत्ता देखील जे काही चालू  आहे तेही काही वाईट नाही. अनेकांच्या लेखी तेही सुख नाही. तेंव्हा जे काही चालू आहे ते उत्तम च चालू आहे हेच खर. कारण ह्या आयुष्याच चांगल वाईट  घडवण हे तुमच्याच हाती असत. जे काही घडल अथवा नाही घडल हे सर्वस्वी तुमच्या निर्णयांच फलित आहे आणि त्याचा आदर राखण ही फक्त तुमची आणि तुमची च जवाबदारी आहे.
पण ज्या तडजोडी मला कराव्या लागल्या त्या मी रतन ला नाही करून देणार त्याला हव ते त्याला करून देणार अगदी पोरग अभिनयात जाणार म्हणल तरी काळजावर दगड ठेवून त्याला पूर्ण पाठींबा देणार कारण तेच तर आई वडिलांचं कर्तव्य असत. बाकी CA होण आमच्या खानदानात च लिहिलेलं दिसत नाहीये. मला इच्छा होती तर परिस्थिती अनुकूल नव्हती तर आमच्या चिरंजीवाना परिस्थिती अनुकूल असून दूर दूर वर इच्छा च नाही.

कालाय तस्मै नम: !!!!!

No comments:

Post a Comment