Wednesday, January 11, 2012

प्रास्ताविक...
जेव्हा मी ब्लॉग लिहू लागलो तेव्हा काही दिवसांनी जाणवले कि आपल्या अवती भोवती च्या बऱ्याच गोष्टी बद्दल अनेक जण आपापल्या दृष्टीकोनातून लिहित असतात. आपण जे विचार मांडतो त्यातून आपले व्यक्तिमत्व समोर येते आणि मग विचार केला जर घटना एक पण त्यावर विचार करणारे,मत मांडणारे व्यक्तिमत्व जर वेगळे असेल तर किती मजा येईल ना?
म्हणून या नवीन वर्षा मध्ये मुंबई मध्ये राहणारे श्रीयुत बोरकर आपल्या भेटील...ा त्यांची डायरी घेऊन भेटायला येणार आहेत.तसे बोरकर अगदी सर्व सामान्य सारखे चाकरमाने आहेत तेव्हा रोज डायरी लिहिणे त्यांना परवडणारे नाहीये पण त्यांनी या वर्षी एक संकल्प केला आहे कि ज्या दिवशी त्यांना एखादी संस्मरणीय घटना आपल्या आयुष्यात झाली आहे असा साक्षात्कार होईल त्या दिवशी ते नक्की डायरी लिहिणार आहेत आणि पर्यायानी तुम्हाला हि ती वाचायला मिळेल.
खर म्हणजे बोरकर ही व्यक्तिरेखा मला "व पु काळे" यांच्या "मायाबाजार" या कथेत सापडली जेव्हा मी कॉलेज मध्ये नाटक करत होतो तेव्हा. त्या वेळेस आम्ही भूमिके चा अभ्यास नीट व्हावा म्हणून त्या त्या पात्राची डायरी लिहायचो.त्या वेळी त्या पात्राच्या दृष्टीने विचार करताना आणि शब्दात मांडताना वेगळीच मजा यायची.ती मजा तो आनंद पुन्हा अनुभवण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करतो आहे. माझी आशा आहे की तुम्हाला ही तो नक्की आवडेल याची मला खात्री वाटते आहे.तेव्हा आज पासून बोरकर तुमच्या भेटीला येतील हे नक्की.
बर बोरकरां बद्दल सांगायचे झाले तर नाव आनंद विलास बोरकर वय ४० वर्षे राहणार दादर मधील चाळ वजा बिल्डींग मधे.घरात त्यांची पत्नी स्वाती आहे जी उत्तम "चाळ गृहिणी"(आता चाळ गृहिणी म्हणजे तिच्यात कोणते गुण असतील हे वेगळे सांगायला नको... असो...) त्यांना एक मुलगा आहे दहा वर्षांचा जो त्यांना लग्नाच्या ५ वर्ष नंतर झाला असल्याने त्यांच्या पत्नीने त्याचे नाव "रतन"ठेवले(खर तर त्याना त्याचे नाव"कोहिनूर"किंवा"हिरा"ठेवायचे होते पण त्याची तहान त्याने रतन या नावावर भागवली)तर असे आहे बोरकरांचे छोटेसे कुटुंब.अजून बोरकरां बद्दल सांगायचे झाले तर बोरकर बी. कॉम. पर्यंत शिकले नंतर सी.ए.चे शिक्षण ही सुरु केले परंतु वडिलांचे निधन आणि घरच्या परिस्थितीमूळे ते अर्ध्यात सोडले व एका प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरी पकडली जे ते अजून ही इमानदारीने करत आहेत. तर असे हे बोरकर ना जुन्यातले जुने ना नव्यातले नवे...मधेच कुठेसे अडकलेले.ना जुन्या विचारांना सोडता येते ना नवीन विचार आत्मसात करता येतात. त्यांची ही डायरी. त्यांचा दृष्टीकोन,विचार,व्यथा,घुसमट कुठे तरी तुम्हाला ही आपल्याश्या वाटतील.तेव्हा या पुढचा प्रवास बोरकरांच्या डायरी च्या एका पानावरून पुढे सरकेल ज्या मध्ये तुमची साथ अतिशय मोलाची आहे आणि जी तुम्ही द्याल अशी मला आशा आहे.....
अधिष

No comments:

Post a Comment