Monday, January 16, 2012

१५ जानेवारी २०१२

१५ जानेवारी २०१२
आज अगदी उत्साहात स्वाती ने बनवलेल्या गरमा गरम गुळाच्या पोळ्या घेऊन ऑफिस ला पोचलो. दरवर्षी प्रमाणे आज ही सगळे जण डब्यावर तुटून पडणार म्हणून मनापासून खुश होतो. पण ऑफिस चा नूर काही औरच होता. आमची सहकर्मचारी शोभा जाधव च्या नवरया चे अपघाती निधन झाले होते. शोभा म्हणजे आमच्या ऑफिस ची शान!! कोणा ची मैत्रीण, कोणाची मुलगी,तर कुणाची उत्तम सहकर्मचारी. घरच्या नाजूक परिस्थिती मूळे कॉलेज चे शिक्षण सुरु असताना तिने आमच्या कंपनी मध्ये नोकरी पकडली. प्रथम clrical काम करत करत तिने तिच्या हुशारी च्या जोरावर accounts department ला बदली मिळवली. मग माझ्या सल्ल्या ने Mcom व DTL पूर्ण केले. स्वतः लग्ना साठी पैसे जमवून लग्न केले. दीड वर्ष पूर्वी च तिला मुलगी झाली होती. सगळे इतक छान चालू असताना तिच्या बाबतीत असे काही होईल असे वाटले देखील नव्हते.
ऑफिस मधले निम्मे लोक सकाळी तर निम्मे लोक संध्याकाळी भेटायला जायचे ठरले होते. मी ऑफिस ला पोचेपर्यंत निम्मे लोक पुढे गेले सुद्धा होते तेव्हा संधयाकाळी जाण्यावाचून माझ्या कडे काहीच पर्याय उरला नाही. सगळा दिवस याच टोचणी मध्ये गेला. एरवी हसणारे,खिदळणारे ऑफिस आज एकदम शांत होते. नंतर नंतर मला त्या शांततेचा ही त्रास होऊ लागला.
अखेरीस आम्ही संध्याकाळी शोभा ला भेटायला तिच्या सासरी ठाण्या ला पोचलो. घरातला कर्ता पुरुष गेलेलं घर भयाण दिसत होते. हसऱ्या आणि बोलक्या डोळ्यांची शोभा हतबल आणि आगतिक पणे नवऱ्या च्या फोटो पुढे बसली होती. दीड वर्षाची तिची मुलगी पायाशी खेळत होती. काय कळणार तिला कि सकाळी च तिचा जन्मदाता बाप तिला सोडून गेला होता. आजूबाजूला नातेवाईकांच्या घोळक्यात बसलेली शोभा एकटीच वाटली मला. मला मोठ्या भावासारखी मानणारी शोभा, तिच्या प्रत्येक प्रोब्लेम मध्ये माझा सल्ला घ्यायची पण आज मी तिच्या साठी काहीही करू शकत नव्हतो.
चौकशी केल्यावर कळले की तिचा नवरा रात्री मित्रांसोबत दारू प्यायला गेला होता. येताना त्याच्या बाईक चा ताबा सुटला आणि एका टेम्पो वर जाऊन आदळला आणि जागी च गेला. तसा दारू चा नाद नव्हता त्याला नाहीतर शोभा बोलली असती मला. मजा म्हणून इतकी प्यायला की जीवन च गमावून बसला. तो क्षणाच्या मजे साठी शोभा ला आणि त्या लेकराला उघड्यावर टाकून गेला. गेलेल्या माणसा बद्दल वीत बोलू नये पण मला त्याचा राग आला होता त्याच्या मजेसाठी त्याला अजून दोन आयुष्य बरबाद करायचा काही च अधिकार नव्हता.
शोभा च्या घरून स्टेशन कडे निघालो येताना वाटेत मला माझे मोहाचे प्रसंग आठवले आणि ते मी टाळले याचा मला अभिमान वाटत होता. त्या मूळे अनेक मित्र गमावले होते मी पण आज त्याची खंत वाटत नव्हती मला.....स्टेशन वर आलो तर ९.०७ ची दादर लोकल ठाणे स्टेशन वर उभी च होती.रात्रीची वेळ त्यात विरुद्ध दिशेचा प्रवास तेव्हा गाडीला विशेष गर्दी नव्हती. इंजिन च्या मागच्या च डब्यात बसलो.गाडी सुरु झाली. पुढे भांडूप स्टेशन ला काही रेल्वे कर्मचारी माझ्या डब्यात चढले.
रुळांची व सिग्नल ची देखरेख करणारे ते कर्मचारी होते. त्यांच्या हातात कंदील, हातोडे आणि पहार होती. त्या मधला अतिशय वयस्कर गृहस्थ साधारण ६० च्या आसपास चा वाटत होता. अतिशय किरकोळ अंगयष्टी चा तो इसम भेलाकांड्या खात च डब्यात चढला. त्याचा खांद्या वरील हातोडी जरी त्याच्या अंगावर पडली असती तरी गेला असता इतका कृश होता तो!! तो डब्यात चढला आणि डोळे मिटून समोर च्या बाकावर बसला. त्यांचे इतर दोन कर्मचारी त्याचा शेजारी बसले. चवथ्या कर्मचाऱ्याला तिथे जागा नव्हती म्हणून तो माझ्या शेजारी येऊन बसला.
तो डोळे मिटून तो गाडीचा आवाज ऐकत होता, गाडी जाताना जरा कुठे रुळाचा वेगळा आवज त्याला जाणवला की तो सोबतच्या कर्मचाऱ्यांना काही सूचना सांगत होता. काही वेळाने त्यांच्या मध्ये मजा मस्करी सुरु झाली. आणि विषय होता त्याची दारू. माझ्या शेजारील गृहस्थ त्याला म्हणाला," बाबा आज काम निट करनास नक्की च विदेशी पिऊन आला असशील देशी प्यायला असता तर कस झाक काम केले असतंस बघ!!!" मी न राहवून त्या इसमाला म्हणल,"अहो कशाला त्यांना अजून दारू प्यायला प्रवृत्त करताय ? अहो त्यांच वय बघा!! त्यांची अवस्था बघा! अशात त्यांना सावरायचं सोडून तुम्ही त्यांना अजून प्यायची फूस काय लावता?" माझ्या बोलण्या वर हसत हसत तो माणूस म्हणाला '"साहेब आम्ही कोण आलो त्याला फूस लावनारे ? आमचा बाबा वयाच्या १७ व्या वर्षी पासून पेतोय. आज त्याच्या इतक कष्टांच अन कसबी च काम आमी कुनी बी करू शकत न्हाय!! आज तो जो काही उभाय तो दारू मुळच नाही तर एखादा काव्हाच गचकला असता एवढे कष्ट केलेत बाबा न आमच्या..४ थी नापास हाय पण नॉलेज इतक हाय कि भले भले इंजिनियर पन बाबा कड सल्ला मागायला येत्यात. ३ पोरींची लग्न लावली आणि आज बी कष्टा नि बायाकुच अन पोलियो झालेल्या पोराच पोट भरतोय ते या दारू मुळच. पावन समदी च लोक मजा म्हणून नाय पेत दारू." एवढ बोलून ते सगळे कांजुरमार्ग स्टेशन ला उतरून गेले. भेल्कांड्या देत जाणाऱ्या त्या इसमा कडे मी पाहतच राहिलो.
एका दिवसात एकाच गोष्टीचे परस्पर विरोधी पैलू कधीच माझ्या समोर आले नव्हते. अस्वस्थ मनाने घरी आलो. पण अजून ही त्याच दोन घटना माझ्या मनात एकमेकांशी वाद घालत आहेत. शोभाचा संसार उध्वस्त करणारी दारू वाईट की त्या माणसाचा संसार उभा राहावा या साठी कामी येणारी दारू चांगली यात मनाचा पार गोंधळ उडला आहे.
मला वाटते कोणतीही गोष्ट वाईट नसते. ती आपण ज्या परीस्थिते मध्ये अवलंबतो त्यावर तिचे भवितव्य अवलंबून असते.
परमेश्वरा माझ्या वर अशी वेळ आणू नकोस रे बाबा!!! आणि आली तरी अशा कशा चा ही अवलंब न करता ती लढायची ताकद दे.... पण देवा तुम्ही का स्वर्ग मध्ये सोमरस पिता काही प्रोब्लेम आहे की.....???

4 comments:

  1. u r absolutely right adhish..कोणतीही गोष्ट कोणत्या परिस्थितीत अवलंब केल्यामुळे त्याचा परिणाम कसा होऊ शकतो आणि कसा होऊ द्यावा याची जाण होण्याची संधी देव आपल्याला देतो ... मग कोण कसा अवलंब करतो हे ज्याचं त्याने ठरवायचं ... impact should be best ... u have done fantastic curious end of this para...
    gr8...

    ReplyDelete
  2. Cool! Nice! Keep Writing! Thumbs up!

    ReplyDelete